मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होत आहे. ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षणापासून मुकावं लागल्याचा दावा भाजपकडून होतोय. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या आरोपामुळे राज्यात खळबळ उडालीये. मराठा आरक्षणा संदर्भातील मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या अहवालातील तब्बल चार हजार पाने गायब असल्याचा दावा लोणीकरांनी केलाय.
भाजप नेते लोणीकर यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत टीका केली आहे. त्यांनी मराठा आरक्षण संदर्भातील मागास वर्गीय आयोगाने दिलेल्या अहवालातील तब्बल ४ हजार पाने गायब असल्याचा आरोप केलाय. तसेच गायब झालेले चार हजार पाने ही सुप्रीम कोर्टात दाखल झाली नसल्याचेही सांगितले आहे. मराठा समाजाचा कोणी विश्वास घात केला? असा प्रश्न त्यांनी यानिमित्त उपस्थित केला आहे. या सर्व प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणीसुद्धा लोणीकर यांनी केली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण कायदा अंमलात असताना राज्यसेवा मुख्य परीक्षेची जाहिरात, पूर्व परीक्षा, मुलाखत, परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिफारस हे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. तरीही महाराष्ट्रातील जवळपास २१८५ उमेदवारांची काहीही चूक नसताना त्यांना नियुक्तीपत्र दिले नाही, असे नमूद करत त्यांना तातडीने नियुक्ती पत्र देण्यात यावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गरम पाणी प्यायल्याने कोरोना विषाणूपासून बचाव होत नाही; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
- ‘पीक कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार’, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
- महत्त्वाचे! ‘इएसआय’ सदस्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेऊन खर्च परत मिळणार
- आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारचे मोठे पाऊल, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आयोगाच्याच वकिलाची टीका, पदाचाही दिला राजीनामा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
