Share

शिवभोजन थाळीबाबत भातखळकरांना नेमके काय म्हणायचे आहे?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनच्या नियमांत १५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. या लॉकडाऊनच्या काळात गोर-गरिबांना मोफत भाेजन देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यासाठी शिवभोजन थाळी दोन महिने मोफत मिळणार आहे. मात्र, याच शिवभोजन थाळीबाबत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी विचित्र योगायोग जुळवला आहे.

या संदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, ‘शिवभोजन थाळीसाठी ५५०० कोटींचं पॅकेज, पुढचे २ महिने शिवभोजन थाळी मोफत… मुख्यमंत्र्यांची घोषणा…केंद्र सरकार दोन महिने गहू तांदूळ मोफत देणार आहे आणि शिवभोजन थाळी ही दोन महिने मोफत मिळणार आहे… काय विचित्र योगायोग आहे नाही…’

यामध्ये शिवभोजन थाळीबाबत भातखळकर यांनी कोणताच प्रश्न विचारला नसला तरी त्यांचा इशारा कोणत्या बाजूने आहे, हे लगेच लक्षात येते. शिवभोजन थाळीबाबत आधीपासूनच भाजपच्या वतीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यामध्ये मोठा भ्रष्ट्राचार होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!