🕒 1 min read
मुंबई : राज्यात १४ एप्रिल पासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यातही घोषित केलेले आर्थिक पॅकेज अद्याप देण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत गरिबांनी जगायचं कस? असा प्रश्न भाजप नेते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केलाय. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांना प्रश्न विचारले आहेत.
उपाध्ये यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठकारे सांगा गरिबांनी जगायचं कस? १४ एप्रिलपासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केला त्यावेळी जे पॅकेज जाहीर केले त्याचे काय झाले सांगा. आता आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे, सामान्यांनी कसे जगायचे सांगा… ५ लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी १५०० रुपये तर १२ लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रु देण्याचे जाहीर केले होते. कितीजणांना प्रत्यक्ष मदत दिली सांगा. अपयश झाकायला कांगावा व अकांडतांडव पण जनतेला मदत करायचे म्हणल्यावर हे सरकार कोडगे बनते. दुर्बल घटकांना मदत करायची सरकारची इच्छाच नाही.. संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केलेल्या निर्णयाला आज १५ दिवस उलटले तरी आधीच तुटपुंजी जाहीर केलेली मदत ही या वसुली सरकारला लाभार्थ्यांना देता आलेली नाहिये.’
मुख्यमंत्री @OfficeofUT जी सांगा गरिबांनी जगायचं कस? 14 एप्रिलपासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केला त्यावेळी जे पॅकेज जाहीर केले त्याचे काय झाले सांगा. आता आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे, सामान्यांनी कसे जगायचे सांगा…१
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 30, 2021
राज्यात कोरोना रुग्ण संख्या अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलाय. त्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केलीय. त्यामुळे लॉकडाऊन हाच पर्याय आहे. मात्र, त्यात गरिबांचे हाल होत आहे. राज्य सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाडचे अवघ्या 34 व्या वर्षी कोरोनामुळे निधन
- लोकप्रिय पत्रकार रोहित सरदाना याचं निधन, कोरोना उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका
- टी-२० विश्वचषक कुठेही झाला तरी यजमानपद हे बीसीसीआयच्याच हाती
- विनाकारण फिरणारांनो सावधान ! लाॅकडाऊनची नांदेडमध्ये कडक अंमलबजावणी सुरु
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी साधणार जनतेशी संवाद; कोरोना पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
