उस्मानाबाद: सध्या कोरोना महामारीचा जिल्ह्यातील शहरी भागांसह ग्रामीण भागात चांगलाच फैलाव होत आहे. हा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची चांगलीच दमछाक होत असल्याचे पहायला मिळत आहे. परंतू ग्रामीण भागात मात्र स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ व नियोजन शुन्य त्याचबरोबर दुर्लक्षामुळे कोरोना बाधित रुग्णांचा तेर येथे गावभर मुक्तसंचार सुरू असल्याने गावातील कोरोना रुग्ण संख्या वाढीचा दर कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना या महाभयंकर महामारीचा प्रसार व संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने खाजगीसह सरकारी दवाखान्ये पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात आले असून या रुग्णांच्या घरांवर प्रशासनाकडून टिकर चिटकावण्यात आले आहे. असे असले तरीही होम आयसोलेशन असलेले कोरोना बाधित रुग्ण सध्या गावभर तोंडाला मास्क न लावता मुक्त संचार करत आहेत.
त्यामुळे तेर येथील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेवर कारवाई करुन होम आयसोलेशनमधील कोरोना बाधित रुग्ण मोकाट फिरणार नाहीत यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी पुढाकार घेतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- रामदास आठवले एक महिन्याच्या वेतनातून आंबेडकरी कलावंतांना मदत करणार
- लोक मरावेत अशीच केंद्राची इच्छा आहे असं दिसतंय, न्यायालयाने केंद्र सरकारला झापले
- लशीच्या वेगवेगळ्या किंमतीवरुन जावेद अख्तर भडकले,ट्वीट करत केली नाराजी व्यक्त
- पीएम केअर्स फंडातून तब्बल एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीला मंजुरी
- पुनावाला यांच्या जीवाला धोका? गृह मंत्रालयाने पुरवली ‘वाय’ दर्जाची सुरक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
