Share

मांजरा धरणातुन सोडण्यात येणारे पाणी कालव्याच्या शेवटच्या टोका पर्यंत मिळावे – अमित देशमुख

Published On: 

लातूर: मांजरा धरणातून उजव्या व डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अनाधिकृत उपसा तातडीने थांबवुन कॅनॉलच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणीपुरवठा होईल याची दक्षता घ्यावी, कासारखेडा व परीसरातील गावांनाही नदीव्दारे पाणी सोडावे, आठ दिवसात कार्यवाही पूर्ण करून अहवाल सादर करावा असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.

गुरूवार दि. १५ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री विलासराव देशमुख यांनी या बैठकीदरम्यान अधिकार्यांना सूचना दिल्या. या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, इतर वरिष्ठ अधिकारी तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लातूर येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पालकमंत्री देशमुख यांनी मांजरा धरणातील पाण्याचा वापर काटकसरीने व्हावा, अपव्यय टाळावा, कॅनॉलचे अस्तरीकरण व्यवस्थित करून करून अनाधिकृत उपसा होणार नाही याची दक्षता घ्यावी, त्याचबरोबर कॅनलच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणीपुरवठा व्हावा. धरणाच्या कमांड एरिया मधील कासारखेडा व परिसरातील गावांनाही नदीच्या पात्राद्वारे पाणीपुरवठा करावा, असे निर्देश दिले आहेत. तसेच तात्काळ नियोजन करून मांजरा धरण क्षेत्रातील कालव्यातून सर्व शेतकऱयांना शेतीसाठी पाणी पुरवठा सुरळीतपणे कसा देता येईल यासाठी कारवाई करावी, कालवा समिती बैठकीत ठरल्या प्रमाणे शेतकऱ्यांना सुरळीत पाणी कालव्यातून उपलब्ध करून दिले जावे अशा सूचना या वेळी अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!