Share

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच पॅकेज म्हणजे जुनीच दारू नव्या बाटलीत टाकून दिली’

Published On: 

पंढरपूर : कोरोना संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपासून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात 144 कलम लागू राहील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेला संबोधित करताना ही माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना गरजू घटकांसह हातावर पोट असलेल्या (रिक्षाचालक, फेरीवाले, बांधकाम मजूर आदी) नागरिकांसाठी मदतीची घोषणा केली आहे. दरम्यान, या पॅकेजवर भाजपच्या नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पंढरपुरातील प्रचारसभेत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

‘ठाकरे सरकारकडून आम्हाला प्रचंड अपेक्षा होता. हातावर पोट असणाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये हे सरकार देईल असं वाटत होतं. परंतु या सरकारने काहीच दिलं नाही. जुनीच दारू नव्या बाटलीत टाकून दिली. जुन्याच योजना नव्याने आणल्या सारख्या दाखवल्या,’ अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!