मुंबई : श्रेयश अय्यरला दुखापत झाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाचा कॅप्टन रिषभ रिषभ पंतला करण्यात आले. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटलने चेन्नई वर मात करत सामना एकतर्फी जिंकला. प्रथम फलंदाजीसाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 7 गडी गमावल्यानंतर 188 धावांची सन्माननीय धावसंख्या उभारली.
प्रतिउत्तरात शिखर धवन आणि पृथ्वी शॉच्या मदतीने दिल्ली कॅपिटलने आयपीएलच्या 14 व्या सत्रातील पहिल्या सामन्यात चेन्नईचा 7 गडी राखून चेन्नईचा पराभव केला.धवन आणि पृथ्वीच्या फलंदाजीमुळे दिल्लीने हे लक्ष्य सहज 18.4 षटकांत गाठले. धवनने 85 धावा केल्या आणि पृथ्वीने 72 धावांची तुफानी खेळी केली. रिषभच्या नेतृत्वाची शानदार सुरुवात पाहायला मिळली.
शिखर धवन देखील पंतच्या नेतृत्व क्षमतेमुळे प्रभावित झाला आहे. धवन रिषभच्या नेतृत्वबद्दल म्हणला, ‘पंतने शानदार कामगिरी केली. सर्वप्रथम आनंदाची बाब म्हणजे त्याने नाणेफेक जिंकली. या खेळपट्टीनंतर नंतर फलंदाजी करणे चांगले असते. त्याने धैर्य कायम राखत खेळाडूंना प्रेरित केले. त्याने चांगले बदल केले. कर्णधार म्हणून त्याची ही पहिली लढत होती. त्यामुळे अनुभवासह तो अधिक परिपक्व होईल, असा मला विश्वास आहे.’ धवन पुढे म्हणाला, ‘ऋषभबाबत सर्वोत्तम बाब म्हणजे तो धैर्य कायम राखतो. तो हुशार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- प्रवीण अमरेंमुळे उत्तम कामगिरी करू शकलो : पृथ्वी शॉ
- डेव्हीड वॉर्नरच्या ‘या’ चुकामुळे झाला हैदराबादचा पराभव
- कोरोनावर मात केलेल्या राणाचे नाणे खणखणीत वाजले; 80 धावांची खेळी करुन उचलला विजयात मोलाचा वाटा
- आजचा सामना राजस्थानविरुद्ध पंजाब
- पांडेवर भारी नितीशचा डाव ; कोलकाताने हैदराबादला 10 धावांनी केले पराभूत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

