🕒 1 min read
कोलकाता: पश्चिम बंगालच्या निवडणुकीत चांगलाच रंग चढला आहे. भाजपा आणि टीएमसी यांच्यात मुख्य लढत आहे. भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत.
दरम्यान नुकताच पंतप्रधान मोदींनी बांगलादेश दौरा केला मोदींचा हा दौरा आणि प. बंगालच्या विधानसभा निवडणूक या योगायोग जुळून आलेला असताना यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.
यामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशदौर्यादरम्यान पुरी कांडी येथील मातुआ समुदायाच्या मंदिरात भेट घेतली. यावरून तृणमूल कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार केली आहे. टीएमसीचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. तृणमूल कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तृणमूल कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचे खासदार शांतनु ठाकूर यांना सोबत घेतले. त्यांच्याकडे कोणतेही सरकारी पद नाही. बांगलादेशातील मंदिरांमध्ये जाण्याचे एकमात्र उद्दीष्ट मतदारांना प्रभावित करणे हे होते. या तक्रारीवर निवडणूक आयोग काय कारवाई करतो हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बंगालमध्ये भाजप २९४ पैकी ३०० जागा जिंकेल’ तृणमूल नेत्याची खोचक टीका
- चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो – उद्धव ठाकरे
- ‘या’ तारखेला विराट आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल होणार
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
