🕒 1 min read
पुणे : जॉनी बेअरस्टोचा शतकी अन् जेसन रॉयच्या महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाहुण्या इंग्लंडने भारताचा 6 गडी व 39 चेंडू राखून धुव्वा उडवला. कुलदीप यादव व कृणाल पांडय़ा या फिरकी गोलंदाजांचे अपयश हिंदुस्थानच्या पराभवाला कारणीभूत ठरले. या विजयामुळे इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 124 धावांची खेळी साकारणाऱया जॉनी बेअरस्टोची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. आता तिसरा व अखेरचा सामना रविवारी पुण्यातच रंगणार आहे.
भारताकडून मिळालेल्या 337 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या सलामीवीरांनी पुन्हा एकदा शतकी भागीदारी करताना विजयाची भक्कम पायाभरणी केली. जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो या जोडीने 110 धावांची भागीदारी रचली. दोघांनी हिंदुस्थानी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. रोहित शर्माच्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे जेसन रॉय 55 धावांवर धावचीत झाला. या खेळीत त्याने एक षटकार व सात चौकार मारले.
जेसन रॉय बाद झाल्यानंतर जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्स या जोडीने टीम इंडियाच्या गोलंदाजांची यथेच्छ पिटाई केली. दोघांनी दुसऱया विकेटसाठी 175 धावांची भागीदारी केली. बेन स्टोक्सने अवघ्या 52 चेंडूंत दहा सणसणीत षटकार व चार दमदार चौकारांसह 99 धावांची खेळी साकारली. भुवनेश्वरकुमारच्या बाऊन्सरवर तो यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद झाला, पण तोपर्यंत त्याने इंग्लंडचा विजय जवळपास निश्चित केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- जालन्यात शनिवारी सायंकाळपर्यंत तरी लॉकडाऊन नाही : जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे
- पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा, मिटकरींचा सवाल
- भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयच्या आगीत दहा जणांचा मृत्यू
- ‘आव्हाड आणि मलिकांनीच तो अहवाल तयार करून कुंटेंना सही करायला लावली’
- ‘नवनीत राणांनी तेव्हा आवाज उठवला असता तर दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
