Share

भारतीय संघासाठी वाईट बातमी?…कर्णधार कोहली होऊ शकतो संघाबाहेर

Published On: 

🕒 1 min read

पुणे : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजय संपादन केल्यानंतर एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज असणाऱ्या भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली वर दोन सामन्याची बंदी येऊ शकते. कारण आयसीसीच्या नियमानुसार कर्णधार कोहली दोषी ठरला आहे. टी-२० मालिकेत झालेल्या एका चुकीमध्ये जर कोहली दोषी आढळला तर त्यावर ही कारवाई होऊ शकते.

आयसीसी नियमानुसार एखाद्या खेळाडूच्या खात्यात २४ महिन्यात ४ किंवा त्यापेक्षा जास्त डिमेरीट गुण जमा झाले तर त्याचे दोन सामन्याची निलंबन होत असते. कोहलीच्या खात्यात सद्दस्थीतीत २ गुण जमा आहेत. मात्र टी-२० मालिकेत केलेल्या चुकीत जर कर्णधार कोहली दोषी आढळला तर त्याच्या गुणात आणखी दोन डिमेरीट गुण जमा होतील. त्यामुळे कर्णधार कोहलीच्या खात्यावर एकूण ४ डीमेरीट गुण जमा होतील.

याआधारे कर्णधार कोहलीवर दोन सामन्याच्या निलंबनाची कारवाई होऊ शकते. यापुर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंचासोबत हुज्जत घातल्यामुळे त्याला दोन डीमेरीट गुण देण्यात आले होते. यानंतर टी-२० मालिकेत पाचव्या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर बाद झाला तेव्हा कोहलीने त्याच्याविरुद्ध असभ्य शब्द वापरले होते आणि असभ्य वर्णन केले होते. जर याप्रकरणी कोहली दोषी आढळला तर त्यावर कारवाई होऊन आयसीसी नियमानुसार त्याच्यावर दोन सामन्याची बंदी येऊ शकते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!