🕒 1 min read
औरंंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाकडून (एस.टी.महामंडळ) मुंबईच्या बेस्ट प्रशासनास सहकार्य करण्यासाठी औरंगाबाद विभागातून पाठविण्यात येणारे कर्मचारी मुंबईला पाठवू नका या मागणीचे निवेदन खा.सय्यद इम्तियाज जलील यांनी नुकतेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात मुंबईला कर्मचारी पाठविणे धोक्याचे असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
औरंगाबाद विभागातून मुंबईला बेस्ट च्या सहकार्यासाठी प्रत्येक आठवड्यात एस.टी.महामंडळाचे २०० ते २५० कर्मचारी (चालक/वाहक) पाठविण्यात येतात. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढता असल्याने एस.टी.महामंडळाच्या कर्मचाNयांत चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने मुंबईला कर्मचारी पाठवू नये अशी मागणी करण्यात येत असून त्या मागणीला एस.टी.प्रशासन केराची टोपली दाखवत आहे. दरम्यान, राज्याच्या इतर विभागातून मुंबईला बेस्टच्या सेवेसाठी कर्मचारी पाठविणे बंद करण्यात आले असले तरी औरंगाबाद विभागातून कर्मचारी पाठविण्यात येत असल्यामुळे कर्मचाNयांत नाराजीचा सुर उमटत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सगळे नियम फक्त जनतेसाठी…? अजित पवारांच्या बैठकीत कोरोनाचे नियम तुडवले गेले पायदळी
- एटीएसच्या करेक्ट कार्यक्रमावर शरद पवार खुश, म्हणाले…
- ‘दिल्लीतील बैठका म्हणजे १०० कोटीच्या हिस्सेदारांची चाललेली धावपळ’
- तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावर ताहिरा कश्यपचं बिकिनी परिधान करून चोख उत्त्तर…..
- मोठी बातमी : अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार दाखल

