Share

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; आता आठवलेही पाठवणार शाहांना पत्र

Published On: 

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरा समोर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची एन आय ए ने चौकशी करून अटक केली आहे. मुकेश अंबानी हे लाखो लोकांना रोजगार देणारे उद्योजक आहेत. त्यांचे घर उडविण्याच्या षडयंत्रा मागे कुणाचा हात आहे याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

राष्ट्रपती राजवट लागू करा, अमित शाहांना पाठवलं पत्र !

स्फोटक प्रकरणासह आतंकवादी गुन्हे प्रकरणात वाझे सारख्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव येत असल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी असून त्यासाठी आपण लवकर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविणार असल्याचे प्रतिपादन रामदास आठवले यांनी आज केले.

‘सचिन वाझे यांचा शिवसेनेशी अनेक वर्षे संबंध राहिला आहे. वाझे सारख्या गुन्हेगारी स्वरूपाच्या अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा शिवसेना आणि राज्य सरकारचा प्रयत्न चुकीचा होता. सचिन वाझे यांचे गॉडफादर कोण हे शोधले पाहिजे. या प्रकरणाचा लवकर उलगडा झाला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी,’ अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!