Share

भाजपच्या विरोधात प्रचार करण्यासाठी राकेश टिकैत प.बंगालमध्ये पोहचले

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता- केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचा संघर्ष अजून देखील सुरु आहे. तीन महिने उलटून देखील आंदोलक शेतकरी हे दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून आहेत. २६ जानेवारी रोजी झालेल्या गोंधळानंतर या आंदोलनावरून नवं वादंग निर्माण झालं आहे. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेलं भाष्य यावर देशातील काही दिग्गज कलाकारांनी व क्रिकेटर्सनी दिलेलं उत्तर, टूलकिट प्रकरण यामुळे या आंदोलनाने वेगळं वळण घेतल्याचं दिसून येत आहे.

शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी भाजपच्या पराभवाचा चंग बांधला आहे. राकेश टिकैत यांनी पूर्वीच्या घोषणेप्रमाणे कोलकाता गाठले आहे. ते दुपारी बंगालमधील शेतकरी नेत्यांशी चर्चा करतील. यानंतर सायंकाळी ते नंदीग्राममध्ये महापंचायत घेतील.

राकेश टिकैत म्हणाले की, बंगाल निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचे काम करू. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही मात्र लोकांना भाजपला पराभूत करण्याचे आवाहन करू. देशातील शेतकरी भाजपच्या धोरणांनी त्रस्त आहेत असा आरोप टिकैत यांनी केला.

कोणाचेही नाव न घेता राकेश टिकैत म्हणाले, ‘दिल्लीतील दरोडेखोरांना तेथून पळ काढावा लागेल. आंदोलन पुढे नेण्यासाठी टिकैत यांनी ‘एक गाव, एक ट्रॅक्टर, 15 माणसे आणि 10 दिवस’ अशी घोषणा दिली आहे याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, शेतक्यांनी पुढील दहा दिवस तयारी करावी. त्यांना दिल्लीला करण्यासाठी कधीही बोलावले जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!