Share

“ठाकरी बाणा” खुर्चीसाठी एवढा लाचार होऊ शकतो ?

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. हा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. तसेच पुजाच्या कुटुंबीयांनी माझी भेट घेऊन एक विनंती पत्र दिल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. हे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवण्यात आले.

पूजाच्या कुटुंबियांचे पत्र सार्वजनिकपणे वाचून दाखवल्याने भाजपच्या शिवराय कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘काल पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबियांचे पत्र वाचून दाखवणे, यापेक्षा पुरोगामी महाराष्ट्राची दुसरी मोठी अधोगती असू शकत नाही. शिवसेनाप्रमुख आणि प्रबोधनकारांनी ओळख दिला तो “ठाकरी बाणा” खुर्चीसाठी एवढा लाचार होऊ शकतो ?’ असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

‘एखाद्या पिडितेच्या पालकांचा आक्षेप नाही म्हणून नराधमांना खुली छूट देण्याचा पायंडा तुम्हाला पाडायचा का ? तक्रार नाही म्हणून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणांना तुम्ही कुलूपबंद करणार का ? भाजपाच्या दबावात तुम्ही राजीनामा तर घेतला पण प्रत्यक्षात तुम्हाला पूजाला न्याय द्यायचा नाही आणि कथित गबरुला क्लिन चिट द्यायची, या मानसिकतेचे तुम्ही जाहीर दर्शन घडवले. राठोडपेक्षा आपलीही मानसिकता वेगळी नाही ! अक्षम्य ! अखेर सुसंस्कृतपणा ढोंगाचा बुरखा फाटलाच !’ असा घणाघात शिवराय कुलकर्णी यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!