🕒 1 min read
जालना : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा भोकरदनमध्ये जननाय म्हणून गौरव करण्यात आला आहे. टोपे यांनी कोरोना विषाणूच्या काळात महाराष्ट्रात प्रत्यक्ष भेट देऊन आरोग्यसेवा केली. राज्यातील जनता हे कधीच विसरणार नाही. असे म्हणत अँड. हर्षकुमार जाधव मित्रमंडळ भोकरदनतर्फे राजेश टोपे यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा ‘जननायक’ असा गौरव करण्यात आला.
राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या समोर एका बाजूला आईचे आजारपण आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील नागरिकांचे आरोग्य अशी दुहेरी परिस्थिती होती. मात्र, अशा परिस्थितीत देखील त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून उल्लेखनिय कार्य केले. त्यांचे हे कार्य महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही, अशा भावणा यावेळी अँड.हर्षकुमार जाधव मित्रमंडळ परिवाराकडून व्यक्त करण्यात आला.
या वेळी कोरोना काळात काम केलेल्या आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि पोलिसांसह कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. अँड.हर्षकुमार जाधव मित्र मंडळांचे नारायण जिवरग, विलास शिंदे, जयंतराव जोशी, फैसल चाऊस, रघुनाथ पांडे, अँड.सुहास देशमुख,राजु इंगळे यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ToolKit प्रकरणातील निकिता जेकब आणि शांतनु कोण? काय होता त्यांचा प्लॅन? जाणून घ्या…
- कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच
- चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, गडकरींनी टोचले स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे कान
- ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिशानंतर आता निकिता जेकब विरोधात अटक वॉरंट
- पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवणाऱ्या ‘या’ भाजप आमदाराला येताहेत धमकीचे फोन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
