Share

ये नया हिंदुस्तान है…जाणून घ्या LAC वरुन चीनने अचानक माघार का घेतली?

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- मागील ९ महिन्यांपासून भारत-चीन या दोन्ही देशांमध्ये सीमासंर्घषामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र, आता हा तणाव निवळण्यास सुरूवात झाली आहे. २४ जानेवारीला लष्कराच्या कमांडर स्तरावरील बैठकीतील एकमतानुसार सैन्य माघारी घेण्यात येत आहेत. ही चर्चेची नववी फेरी होती. याआधीच्या आठ बैठका निष्फळ ठरल्या होत्या.

दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर चीनी सैन्य अत्यंत वेगानं LAC वरुन मागं सरकत आहे. चीन आणि भारत यांच्यात झालेल्या सहमतीनुसार चीननं पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन माघार घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसात चीननं या भागातून 200 रणगाडे हटवले असल्याचं वृत्त आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि एनएसए अजित डोवाल यांनी चीनमधील आपल्या समपदस्थांची चर्चा केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सैन्य पातळीवर सहमती झाली.वारंवार मुजोरी करणारा चीन हा अचानक सैन्य मागे घेण्यासाठी कसा तयार झाला याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, आता याबाबतची काही माहिती माध्यमांना मिळू लागली आहे.  पूर्व लडाखबाबतच्या आपल्या भूमिकेवर भारत ठाम राहिला. चीनचा कुठलाही दावा मान्य करायचा नाही, आपली एक इंचही भूमी सोडायची नाही, हा भारताचा निर्धार कायम होता. त्यानंतर चीनला अखेर नमते स्वीकारुन माघारी फिरावे लागले, असे सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!