मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. चेन्नईच्या चेपक मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
इंग्लंच्या संघाने पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र भारतीय संघ 197 धावाच करू शकल्यामुळे टीम इंडियाला तब्बल 227 धावांनी हार पत्करावी लागली. या विजयासोबतच इंग्लंडच्या संघाने मालिकेत 1 – 0 अशी आघाडी मिळवली आहे.
या पार्श्वभूमीवर शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये कुलदीप यादवला संधी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी केली आहे.कुलदीप यादवला संधी द्यायची असेल, तरी वॉशिंग्टन सुंदरला टीमबाहेर ठेवू नये, असंही गावसकर यांनी सांगितलं आहे. सुंदरच्या बॉलिंगमध्ये काही त्रुटी आहेत, पण त्या खेळून आणि अश्विनबरोबर चर्चा करून दूर होतील, असा विश्वास गावसकर यांनी व्यक्त केला आहे.
गावसकरांनी सांगितल्याप्रमाणे जर कुलदीप यादवला संधी दिली, तर शाहबाज नदीमला बाहेर बसावं लागू शकते. नदीमने या टेस्टमध्ये 4 विकेट घेतल्या, तरी त्याने तब्बल 233 रन दिले आहेत. दरम्यान, पहिल्या सामन्यातील पराभवानंतर विराट कोहलीचं कर्णधारपद काढून घेण्याची मागणी ट्विटरवर काही क्रीडा चाहते करु लागलेले आहेत. विराटचं कर्णधारपद काढून घेऊन अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- जिल्हा शल्यचिकित्सकांकडून मानसिक त्रास, महिला वैद्यकिय अधिकाऱ्याची तक्रार
- ‘राजकीय कुरघोडीसाठी इतका करंटेपणा कुठून येत असेल?’
- अपात्र शेतकऱ्यांचे धाबे दणाणले; तब्बल २.३० कोटींची वसुली
- कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण
- कणखर नेता अशी प्रतिमा असलेले मोदी ‘या’ प्रसंगात देखील झाले आहेत भावूक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
