🕒 1 min read
चेन्नई : भारतीय क्रिकेटपटू घडवणारी सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) घेतला आहे. BCCI चे सचिन जय शहा यांनी याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना पत्राद्वारे कळवली आहे. त्याचबरोबर रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज 45 हजार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देखील BCCI नं घेतला आहे. मात्र नुकत्याच पुढे आलेल्या माहितीनुसार 87 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.
सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धा सध्या सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा घेण्याचा निर्णय BCCI नं घेतला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात. विजय हजारे ट्रॉफीमनध्ये एक दिवसांच्या लढती असतात.
कोरोनामुळे यंदा जवळपास सर्वच क्रिकेट स्पर्धांना उशीर झाल्यामुळे रणजी करंडक रद्द करण्यात आली आणि त्याऐवजी प्राधान्य देण्यात आले ते मर्यादीत षटकांच्या क्रिकेटला. भारतात नुकतीच सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी पार पडली. तमिळनाडूने या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. त्यानंतर आता विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला २० फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार असून १४ मार्च पर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी शनिवारी या कार्याक्रमची घोषणा केली ज्यात त्यांनी सहा ठिकाणांपैकी पाच ठिकाणांचा उल्लेख केला आहे. सुरत, इंदोर, बंगळुरु, कोलकाता आणि जयपूर ह्या प्रमुख शहरात ही स्पर्धा खेळावली जाणार असून प्लेट ग्रुपचे आठ संघाचे सामने हे तामिळनाडूच्या विविध मैदानावर खेळवले जातील.
बीसीसीआयच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक गटात खेळणारे संघ
एलिट ग्रुप ए – गुजरात, चंदीगड, हैदराबाद, त्रिपुरा, बडोदा, गोवा
ग्रुप बी- तमिळनाडू, पंजाब, झारखंड, मध्य प्रदेश, विदर्भ, आंध्र प्रदेश
ग्रुप सी – कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, ओडिसा, रेल्वे आणि बिहार
ग्रुप डी -दिल्ली, मुंबई, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि पॉंडिचेरी
ग्रुप ई- बंगाल,सेना, जम्मू आणि काश्मीर, सौराष्ट्र, हरियाणा आणि चंदिगड
प्लेट ग्रुप – उत्तराखंड, आसाम, नागालँड, मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि सिक्कीम
महत्त्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियन क्रिकेटने केली पुरस्कारांची घोषणा ; स्टीव स्मिथला ‘हा’ मानाचा पुरस्कार जाहीर
- ….त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे: पोलीस कर्मचाऱ्याचा व्हॉट्सअॅपवर मॅसेज
- फॉर्मात असलेला जो रूटची आयपीलमधून माघार ‘हे’ आहे कारण
- ‘वाटत होत मी मंत्री झाल्यावर संकट थांबतील, पण… धनंजय मुंढे झाले भावुक !
- पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
