Share

उर्जा विभागाच्या महाकृषी उर्जा अभियानात २९ शेतकरी मुक्त

Published On: 

हिंगोली : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर उर्जा विभागाच्या वतीने राज्यभरात महाकृषी उर्जा अभियान सुरु केले. हे अभियान शेतकऱ्यांसाठी महत्वाचे ठरत आहे. या अभियानामुळे कृषीपंप थकबाकीतून पुर्णपणे मुक्त होण्याच्या संधीचा फायदा अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे.

जिल्ह्यातील एकूण २९ कृषिपंपधारक शेतकरी अनेक वर्षापासून थकीत वीजबील एकरकमी भरुन थकबाकीमुक्त झाले. या अभियानांतर्गत ३० मीटरच्या आतील सर्व कृषी ग्राहकांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. तसेच ज्या कृषीपंप अर्जदाराचे अंतर लघुदाब वाहिनीच्या २०० मीटरच्या आत आहे व रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे, अशा नवीन कृषीपंप ग्राहकांना तीन महिण्याच्या आत नवीन जोडणी देण्यात येईल.

आकडेवारीनुसार जिल्ह्यातील कृषिपंपधारक शेतकऱ्याकंडे सप्टेंबर २०२० पर्यंत १००० कोटींची थकबाकी आहे. पाच वर्षापुर्वीच्या सप्टेंबर २०१५ पुर्वीच्या कृषीपंप थकबाकीवरील विंलब शुल्क व व्याज माफ करुन, विजजोडणीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांना थकबाकी मुक्त करण्यासाठी सवलत मिळणार आहे, असे अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!