हिंगोली : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर उर्जा विभागाच्या वतीने राज्यभरात महाकृषी उर्जा अभियान सुरु केले. हे अभियान शेतकऱ्यांसाठी महत्वाचे ठरत आहे. या अभियानामुळे कृषीपंप थकबाकीतून पुर्णपणे मुक्त होण्याच्या संधीचा फायदा अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे.
जिल्ह्यातील एकूण २९ कृषिपंपधारक शेतकरी अनेक वर्षापासून थकीत वीजबील एकरकमी भरुन थकबाकीमुक्त झाले. या अभियानांतर्गत ३० मीटरच्या आतील सर्व कृषी ग्राहकांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. तसेच ज्या कृषीपंप अर्जदाराचे अंतर लघुदाब वाहिनीच्या २०० मीटरच्या आत आहे व रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे, अशा नवीन कृषीपंप ग्राहकांना तीन महिण्याच्या आत नवीन जोडणी देण्यात येईल.
आकडेवारीनुसार जिल्ह्यातील कृषिपंपधारक शेतकऱ्याकंडे सप्टेंबर २०२० पर्यंत १००० कोटींची थकबाकी आहे. पाच वर्षापुर्वीच्या सप्टेंबर २०१५ पुर्वीच्या कृषीपंप थकबाकीवरील विंलब शुल्क व व्याज माफ करुन, विजजोडणीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांना थकबाकी मुक्त करण्यासाठी सवलत मिळणार आहे, असे अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- व्हिडिओकॉनच्या कामगारांना मुख्यमंत्री ठाकरेंचे आश्वासन, लवकरच तोडगा काढणार
- मद्यपी तरुणाची डॉक्टरला मारहाण, वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल
- रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी खुशखबर; रेल्वेने सुरू केल्या ‘या’ नवीन रेल्वेगाडया
- अतिक्रमणधारकांचा अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांचे आदेश
- शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही: सुब्रमण्यम स्वामी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
