🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. तर, भाजप नेत्यांनी मात्र या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी अर्थसंकल्पाबाबत प्रश्न केला असता, ‘मी लगेच काही बोलणार नाही. थोडा वेळ घेईन. लगेच बोलणं योग्य नाही. अजून बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. मात्र जे कानावर आलं आहे त्यावरून एवढंच बोलेन की, बजेट हे देशासाठी असावं, निवडणुकांसाठी नाही’ असा टोमणा त्यांनी भाजपला लगावला आहे.
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर ३० मिनिटे बोलावं – निलेश राणे
दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी देखील अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कागद न घेता अर्थसंकल्पावर ३० मिनिटे बोलून दाखवावं असं निलेश राणे म्हणाले आहेत. ‘देशाचा बजेट आज जाहीर झाला, मागचं वर्ष संकटात गेलं तरी यंदाचा अर्थसंकल्प धाडसी आहे… अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर ३० मिनिट बोललं पाहिजे.’ असं खुलं आव्हान राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- अर्थसंकल्पातुन महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं हे शोधावं लागेल – आदित्य ठाकरे
- भारताच्या मागील १०० वर्षांत असं बजेट सादर झालेलं नाही, धन्यवाद सीतारामनजी – अमृता फडणवीस
- …म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचं अभिनंदन करण्याची हिंमत फडणवीसांचीही झाली नाही – अजित पवार
- ‘हा अर्थसंकल्प नसून आगामी काळात 5 राज्यात येऊ घातलेल्या निवडणूकींचा जाहिरनामा आहे’
- #Budget2021 : ‘खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा’ संजय राऊतांचा सरकारला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
