Share

एमआयएमसोबत भविष्यात समझोता नाहीच-प्रकाश आंबेडकर

Published On: 

औरंगाबाद : एमआयएमसोबत भविष्यात कधीच समझोता करणार नाही हे परत एकदा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. शिकलकरी समाजाच्या मेळाव्यानिमित्त ते औरंगाबादेत आले होते. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात हा मेळावा झाला. त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

आम्ही स्वतःच्या बळावर निवडणुका लढू शकतो हे पत्रकारांनी स्वीकारावे असे ते यावेळी म्हणाले. नामांतरापेक्षा औरंगाबादच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मला कळीचा वाटतो. महापालिका वंबआच्या ताब्यात दिल्यास दररोज दोन तास पाणी रात्री दहाच्या आत पुरविण्याची खात्री मी देतो. अकोल्यात आम्ही हे करून दाखवले आहे. आहे त्या परिस्थितीत कोणत्याही खर्चाची योजना न राबविता आम्ही औरंगाबादला दररोज दोन तास पाणी पुरविण्याचे आश्वासन देत आहोत, असे आंबेडकर यांनी जाहीर केले.

राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. सर्व पक्षांनी सर्वात जास्त जागा जिंकण्याचा दावा केला. परंतु वंचित बहुजनच्या किती आणि कुठे जागा निवडून आल्या, याचा तपशील २१ तारखेला देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निकाला संदर्भात विचारणा केली असता, सर्व पक्ष करत असलेल्या दाव्यांच्या होडीमध्ये बसणार नाही. वंचित बहुजन आघाडीने किती जागा ताब्यात घेतल्या याचा तपशील २१ तारखेला मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!