🕒 1 min read
मुंबई:- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप वर्षभराचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. आता, भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
राजकीय पक्षांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कंबर कसल्याने राजकीय वातावरण देखील तापत आहे. अशातच काँग्रेसचे नेते व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दोन महापालिका आयुक्तांच्या नेमणुकीची मागणी केली आहे.
पालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरिकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात. शिवाय मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयात यावे लागते. नागरिकांची होणारी ही गैरसोय पाहता मुंबई शहर व उपनगरासाठी दोन महापालिका आयुक्त असणं गरजेचं आहे, अशी मागणी अस्लम शेख यांनी केली आहे.
दरम्यान, अस्लम शेख यांच्या मागणीला काँग्रेस पक्षातूनच विरोध केला जात आहे. मुंबई महापालिकेत एकच आयुक्त असावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते असलेल्या काँग्रेसच्या रवी राजा यांनी दिली आहे.
अस्लम शेख यांच्या मागणीनंतर, हा मुंबईच्या विभाजनाचा डाव असल्याचा आरोप भाजपाच्या नेतेमंडळींकडून करण्यात आला. महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त नेमण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच अस्लम शेख यांनी भाजपाच्या नेत्यांना धारेवर धरलं. जर मुंबईसाठी दोन जिल्हाधिकारी आणि दोन पालकमंत्री असू शकतात, तर मग इतक्या मोठ्या शहरासाठी दोन आयुक्त का नसावेत? असा सवाल त्यांनी भाजपाला केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘औरंगाबाद की संभाजीनगर हे राजकारणाचे खेळणे’
- मराठा नेते दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत – प्रकाश शेंडगे
- हात जोडून उभं राहण्याशिवाय माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते – उद्धव ठाकरे
- माझी सुरक्षा कमी करा; शरद पवारांचा अनिल देशमुखांना फोन!
- आता अजित पवार यांच्या पत्नीलाही मिळणार सुरक्षा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
