Share

चंद्रकांतदादांच्या गावात शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती 

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने आचारसंहिताही लागू झाली आहे. तर, काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याची वेळ आता संपली असून सर्व उमेदवारांची मुख्य लढत आता स्पष्ट झाली आहे.

मुख्य लढत आता स्पष्ट झाल्यामुळे प्रचाराची धुमशान सुरु झाली आहे. गावागावांत प्रचाराचा धुरळा उडाला असून कोल्हापूरमधील एक ग्रामपंचायत भलतीच चर्चेचा विषय बनली आहे. याचं कारण देखील खास आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शिवसेनेची मैत्री तोडत भाजपला साथ दिली आहे. अर्थात महाविकास आघाडी ही स्थानिक पातळीवर तुटली असली तरी भाजपसोबत हात मिळवणी करून शिवसेनेच्या गटाला रोखल्यामुळे भविष्यातील राजकीय उलथापालथीची ही नांदी आहे का? अशा चर्चांना देखील उधाण आहे.

याचं आणखी एक खास कारण म्हणजे हे गाव खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांचं आहे. शिवसेनेसोबत मैत्री तुटल्यानंतर किती दुरावा या दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झाला आहे हे आरोप-प्रत्यारोपांवर दिसून येत असतानाच स्थानिक पातळीवर देखील हे दिसून आलं आहे. भुदरगड तालुक्यातील खानापूर या गावात सद्या भाजपचेच सत्ता आहे. या निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेला रोखण्यासाठी थेट राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच मैत्रीचा हात दिला आहे. यामुळे या निवडणुकांमध्ये थेट पक्षाचा सहभाग नसला तरी पुरस्कृत गटांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!