मुंबई : भाजपासोबतची युती तुटल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर खूप मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आतापासूनच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
शिवसेनेने यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे. दरम्यान एका बाजूला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना देखील अमराठी मतांसाठी जोरदारपणे तयारीला लागली आहे.
विशेष म्हणजे शिवसेनेकडून यासाठी गुजरातींसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला ही अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
एकीकडे भाजप शिवसेनेच्या या बदलत्या भूमिकेवर टीकास्त्र सोडत असताना महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने शिवसेनेच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे. ‘शिवसेनेच्या भूमिकेवर मी काय सांगू शकतो. महाविकास आघाडी मजबूत व्हावी असं मला वाटतं. कालांतराने भूमिका बदलतात. अनुभवाने माणूस शिकतो. शिवसेनाचा हा बदल स्वागतार्ह आहे’, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- बर्ड फ्लूचं संकट : ‘या’ राज्याने केली राज्यस्तरीय आपत्तीची घोषणा
- त्वरा करा ! फ्लिपकार्टवर रिअलमी डेज सेलला सुरुवात; स्मार्टफोन्सवर खास ऑफर !
- ममता बॅनर्जींची डोकेदुखी वाढली; लक्ष्मी रतन शुक्ला यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा
- लवकरात लवकर मेगाभरती घ्या नाहीतर मेगा आंदोलन करू; ओबीसी समाज आक्रमक
- संजय राऊत भाजपला सुरुंग लावण्याच्या तयारीत; राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
