🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रदूरभाव झाल्याने सर्वच क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला आहे. शैक्षणिक क्षेत्रास देखील यामुळे अनेक बदल होत असल्याचे दिसून येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या बोर्डांच्या परीक्षांचे वेध लागण्यास आता सुरुवात झाली आहे.
अशातच, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्यानं केंद्र सरकार अधिक सतर्क झालं आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी वर्तवलेल्या कोरोना लाटेचा अंदाज देखील केंद्राने येत्या काळातील नियोजनासाठी लक्षात घेतला आहे. भारतात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून केंद्राने पावले उचलले आहेत.
त्यामुळेच CBSE बोर्डाच्या परीक्षेबाबतही केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये CBSE बोर्डाची परीक्षा होणार नसल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली होती. आता, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी नेमक्या परीक्षा कधी होणार याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
‘१० वी, १२ वी CBSE बोर्डाच्या परीक्षा ४ मे पासून घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. १० जून २०२१ पर्यंत या परीक्षा घेतल्या जातील आणि १५ जुलैपर्यंत या परीक्षांचा निकाल लावला जाईल,’ अशी माहिती त्यांनी दिली आहे. अद्याप सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं नसलं तरी कालावधी निश्चित केला गेला आहे.
यासोबतच, १० वी आणि १२ वीच्या प्रयोग परीक्षा(प्रॅक्टिकल), प्रोजेक्ट आणि अंतर्गत गुणवत्ता चाचण्या १ मार्च पासून ते लेखी परीक्षांच्या तारखेआधी घेण्यासाठी देखील महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. लवकरच लेखी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केली जाईल,’ अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे.
We have decided to conduct Class 10th & Class 12th CBSE board exams from May 4. The exams will conclude by June 10, 2021. Results will be out by July 15: Union Education Minister Ramesh Pokhariyal pic.twitter.com/UcRMBhqgRj
— ANI (@ANI) December 31, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘पवार साहेब, आता तरी पीडित मुलीला न्याय देणार का?’
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाच्या कामाला वेग; समितीची स्थापना
- ‘…अन्यथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे ऑफिस फोडण्यासाठी रयत क्रांती संघटना मागे-पुढे पाहणार नाही’
- मी रात्री ११ वाजता तिच्या घरी पोहोचलो आणि राहिलो तर? युवकाच्या या प्रश्नाला मुंबई पोलिसांचं सडेतोड उत्तर
- खबरदार! शहराबाहेर जात असाल तर उद्या संचारबंदी संपल्यानंतरच परत या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
