Share

विनाआरसा गाडी चालवताय, मग तुम्हाला होऊ शकते शिक्षा !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रस्त्यावर वाहन चालवणाऱ्यांमध्ये बेशिस्तपणा असल्याने याच कारणामुळे अपघात झालेचे दिसून येते. यामध्ये हेल्मेट न वापरणे, वाहनांना विशेषतः दुचाकींना आरसे नसल्याने मागील वाहने न दिसल्याने अनेकांचे अपघात होतात. यासाठी परिवहन विभागातर्फे मोहीम हाती घेण्यात आली आहे.

नव्या वर्षात टोलनाक्यापासून गाड्यांपर्यंतचे नियम बदलू लागले आहेत. टोलनाक्यावर फास्टॅग अनिवार्य करण्यात आलाय. दुसरीकडे विनाआरसा गाडी चालवणाऱ्यांना आता आरटीओची नजर असणार आहे. वाहन चालवताना लायसन्स, कागदपत्रे, विमा पॉलिसी, पीयूसी प्रमाणपत्र, वाहनांच्या दोन्ही बाजूचे आरसे बंधनकारक आहेत. विनाआरसा वाहन चालविणाऱ्यांना पाचशे रुपये दंड आकारला जाणारेय.

तरुण मुलांमध्ये विनाआरसा गाडी चालवण्याचे प्रमाण जास्त असते. तर याच तरुणाच्या गाड्यांना आरसे नसल्याचे देखील आढळून येते. गाडीला आरसा नसल्यास चालकास मागच्या गाड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याच्या घटना घडतात. यावर आळा घालण्यासाठी वाहनांचा नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले.

परिवहन विभागातर्फे विनावाहन परवाना, विना कागदपत्रे, विमा पॉलिसी असणाऱ्यांवरील कारवाई होणार आहे. तसेच फॅन्सी नंबर प्लेट न वापरण्याचे आवाहन देखील परिवहन विभागातर्फे वारंवार करण्यात येते. मोबाईलवर बोलत वाहन चालविण्यांनाही भुर्दंड पडतो. आता विभागाने आरसे नसणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतलीय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!