Share

कोर्टाचा अवमान करणाऱ्या संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करा; भाजपची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- मेट्रो कारशेड उभारण्यासाठी मुंबईतली कांजूरमार्ग इथली 102 एकर जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA ला हस्तांतरित करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयानं काल अंतरिम स्थगिती दिली. या स्थगिती आदेशानं राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे.

संजय राऊत यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर टिप्पणी केली होती. हायकोर्टाचा निर्णय दुर्दैवी आहे. ही जमीन महाराष्ट्राची, सरकार महाराष्ट्राचं, मग हे मिठागरवाले आले कुठून? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला होता. महाराष्ट्रात भाजपचं सरकार नसल्यामुळे असे निर्णय येत आहेत का? असा प्रश्न लोकांना पडत असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं.

दरम्यान, संजय राऊत यांची वक्तव्ये बेताल आणि बेजबाबदार आहेत. आज तर थेट न्यायालयाने काय केलं पाहिजे हेच ते सांगत आहेत. राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, असं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

संजय राऊतांनी कोर्टावर असं भाष्य करणे हा कोर्टाचा अवमान आहे. राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. सर्वोच्च न्यायव्यवस्था असताना त्यांच्यावरच असे आरोप करणे चुकीचं आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे, असे दरेकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!