मुंबई : वास्तुरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांकडून अर्णब गोस्वामींसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याला तसेच नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्याची मागणी करत अर्णबसह इतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, अलिबाग पोलिसांनी अलिबाग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांना दिली. तसेच आरोपपत्राची प्रत मिळण्यासाठी गोस्वामींच्या वकिलांनी अर्ज केल्यास त्याविषयी लवकरात लवकर कायदेशीर कार्यवाही करून प्रत द्यावी, असे निर्देश दंडाधिकारी न्यायालयाला देऊन याविषयीची पुढील सुनावणी ६ जानेवारीला ठेवली.
न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर बुधवारी यावर ऑनलाईन सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी काल ही माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या
- योग्य व्यक्तीस न्याय मिळण्यासाठीच निवडणुकीनंतर नव्याने होणार आरक्षण सोडत – हसन मुश्रीफ
- येळकोट, येळकोट…जय मल्हार : खंडेरायाच्या जेजुरीगडाला आकर्षक रोषणाई!, पहा फोटो
- अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्यासाठी राज्यात शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा करा : भाजपा
- ‘महाविकास आघाडीच्या माध्यमातून मेट्रोचे काम होत आहे याची पोटदुखी भाजपाला झाली आहे’
- ‘या’ संस्थेच्या कारभारात प्रचंड अनियमितता आढळल्याने धनंजय मुंडे यांनी दिले चौकशी करण्याचे निर्देश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
