🕒 1 min read
मुंबई : टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना सरकारने पाठवलेल्या भरमसाठ वीजबिलामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.राजकीय पटलावर देखील सध्या वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजतोय.
लॉकडाऊन काळात ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे त्यांना वाढीव दराने बिल आल्याची घटना गेले काही महिने घडत आहे. या मुद्द्यावर राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वाढीव वीजबिलाबाबत विचार केला जाईल व ग्राहकांना दिलासा दिला जाईल असं सांगितलं होते. पण काही दिवसांपूर्वी राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, वीजबिलात ग्राहकांना कोणतीही सवलत मिळणार नाही असं सांगितलं.
त्यानंतर ही जनतेची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप करत विरोधी पक्ष ठाकरे सरकारविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत.मनसेने या आंदोलनाच्या निमित्ताने वाढीव वीजबिलाविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे.मनसेने येत्या २६ नोव्हेंबरला मनसेकडून नव्या आंदोलनाची हाक दिली असून वाढीव वीजबिलाविरोधात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.
आता आम्ही सरकारला हात जोडून सांगत आहोत पण जर सरकारने ऐकलं नाही तर आम्हांला हात सोडावा लागणार आणि मग सरकारला पळता भूई करून सोडणार असल्याची माहिती मनसेचे चेंबूर विभाग प्रमुख कर्णबाळा दुनबळे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा विद्यार्थ्यांनो EWS आरक्षण घेतल्यास SEBC आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही’
- ‘ही’ अट मान्य असेल तरच मनसेशी युती करू; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य
- पदवीधर व शिक्षक निवडणुकांच्या निकालानंतर राज्य सरकार पडणार – प्रवीण दरेकर
- मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही : मनसे
- आधी पाकिस्ताननं बळकावलेलं काश्मीर भारतात आणा, कराचीला आपण नंतर जाऊ’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
