Share

बिहारच्या जनतेने नवा रेकॉर्ड रचावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन

Published On: 

🕒 1 min read

बिहार : देशाचं लक्ष्य सद्या बिहारच्या निवडणुकांकडे लागलं आहे. कोरोनाच्या हाहाकारानंतर देशात पहिलीच निवडणूक पार पडत आहे ती बिहारच्या विधानसभांसाठी. बिहारमध्ये आज तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.

तिसऱ्या टप्प्यात 78 जागांसाठी मतदान होत असून नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात जोरदार कसोटी रंगत आहे. ही आपली अखेरची निवडणूक असल्याचं नितीश कुमार यांनी जाहीर केल्यानंतर ही निवडणूक आता प्रतिष्टेची बनली आहे.

दरम्यान, आजच्या अंतिम टप्प्यातील मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून बिहारच्या जनतेला मतदानाच नवा विक्रम बनवा असं आवाहन केलं आहे. ‘बिहार विधानसभा निवडणुकीचे आज तिसरे आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आहे. सर्व मतदारांना माझी विनंती आहे कि त्यांनी जास्तीत जास्त संख्येने लोकतंत्राच्या या पावन पर्वात भागीदार बनावं आणि मतदानाचा नवा रेकॉर्ड रचावा. आणि, मास्क घालावा तसेच सोशल डिस्टंसिंगची देखील काळजी घ्यावी’ असं ट्विट करून त्यांनी मतदारांमध्ये जागृती निर्माण केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!