Share

सत्ता टिकविण्यासाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडले- राधाकृष्ण विखे

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी बाबरी मस्जिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली, एवढे समर्थन केले होते. मात्र, आज त्यांच्याच शिवसेनेने सर्वच भूमिकांमध्ये बदल केला आहे. सध्या शिवसेनेने हिंदुत्व सोडले असून सत्ता टिकवण्यासाठी आपली सर्व तत्वे गुंडाळली आहेत, असा घणाघात माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

नगरचे नूतन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांची भेट घेण्यासाठी आ.विखे पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर तोफ डागली.

आ.विखे पुढे म्हणाले की, बाबरी मशीद पडली तेव्हा महाराष्ट्रात आगडोंब उसळल्यावर फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पुढे आली. त्यामुळे हा महाराष्ट्र वाचला. परंतु आजच्या शिवसेनेचा विचार केला तर त्यांनी सत्ता टिकवण्यासाठी सर्व मुद्दे सोडून दिले आहेत, हिंदुत्व सोडले आहे. आज शिवसेनेने सर्वच भूमिकांमध्ये बदल केला आहे, अशी टीका विखे पाटलांनी केली.

विधानसभेवर स्वबळावर भगवा फडकविण्याचे वक्तव्य मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. यावर बोलताना माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शिवसेनेचा स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता दिसतेय.

महाविकास आघाडीत का बेबनाव झाला? तो का वाढत आहे? शिवसेना स्वबळावर लढण्याचा नारा का देत आहेत? राज्यातील जनतेसाठी नव्हे तर मूठभर लोकांना सत्ता टिकवण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत, असे आ.विखे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!