मुंबई- राज्यातील मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे १ नोव्हेंबर पर्यंत उघडली नाही तर नाईलाजाने टाळे तोडावे लागेल, असा इशारा भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी काल दिला आहे.
आघाडीच्या शिष्टमंडळाने बुधवार 28 ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.मंदिरे उघडण्याच्या मागणीकरिता दोन मोठी आंदोलने करुन सुद्धा कोणताही निर्णय न घेतल्याने आध्यात्मिक समन्वय आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन वेळा पत्रे पाठवून साधु-संतांच्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ मागितली होती आणि दि. २७ ऑक्टोबर पर्यंत मंदिरे उघडण्याची मागणी केली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीची वेळही दिली नाही तसेच मंदिरे उघडण्याचा निर्णय देखील घेतला नाही. यामुळे बुधवार, दि. २८ ऑक्टोबर २०२० रोजी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वात विविध पंथ व संप्रदायांच्या प्रमुख साधु-संतांचे शिष्टमंडळ महामहिम राज्यपाल महोदयांना भेटले.
या शिष्टमंडळात पुढील संत महंत होते.
1) आचार्य तुषार भोसले, प्रदेश संयोजक, आध्यात्मिक समन्वय आघाडी 2) संजयनाना महाराज धोंडगेविश्वस्त , श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर 3) भाऊ महाराज फुरसुंगीकर , केंद्रीय धर्मसभा अध्यक्ष ,अ.भा. वारकरी मंडळ 4) सुदर्शन महाराज कपाटे महानुभाव , अध्यक्ष, ग्लोबल महानुभाव संघ5) आचार्य जिनेंद्र जैन , समन्वयक,जैन स्वाध्याय विभाग 6) सुरेंदरसिंग सुरी, शीख पंथ प्रतिनिधी 7) केशवचंद्र दास : ISKCON प्रतिनिधी 8) भदन्त शांतिरत्न, अध्यक्ष, मुंबई भिक्कु संघ 9) नितीनभाऊ मोरे, अध्यक्ष, बौद्ध उपासक उपासिका महासंघ10) श्रीमहंत गिरीजानंद सरस्वती, कोषाध्यक्ष, अ.भा. आखाडा परिषद
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : तातडीने घटनापीठ स्थापन करा! सरकारची मुख्य न्यायमुर्तींना दुसऱ्यांदा विनंती
- नगरच्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला १० हजारांचा चेक; म्हणे गांजा व खसखसची शेती करू द्या!
- ‘राहुलजी, जरा एकदा पाहा पाकिस्तानाला मोदींची किती भीती वाटते’
- मुंबई : ९०० कोटींचा जमीन घोटाळा झाल्याचा सोमय्या यांचा आरोप;चौकशी करण्याची मागणी
- ‘लक्ष्मी बॉम’ आणखी एका वादाच्या विळख्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

