Share

मराठवाड्यातून ८ हजार विद्यार्थ्यांचा आयटीआयला प्रवेश

Published On: 

औरंगाबाद : आयटीआय अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू असून आतापर्यंत औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली तसेच उस्मानाबाद, नांदेड, लातूर या आठ जिल्ह्यातील शासकीय आयटीआय महाविद्यालयात ८ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

आयटीआयला दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांचा कल कायम आहे. यंदा शासकीय आयटीआय महाविद्यालयात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या आठ जिल्ह्यातील एकूण ८२ शासकीय आयटीआय महाविद्यालयात यंदा १४ हजार ९४८ जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहेत.

या जागांपैकी आतापर्यंत ८ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. आयटीआय शासकीय महाविद्यालयात आतापर्यंत १४ हजार ९४८ जागांपैकी केवळ ५८. ६४ टक्के प्रवेश झाले आहेत. अजूनही ६ हजार १८३ जागा रिकाम्याच आहे. यासाठी सध्या प्रवेशप्रक्रिया अजूनही सुरू असून या जागा देखील भरल्या जातील अशी अपेक्षा महाविद्यालयाकडून व्यक्त केली जात आहे. या जागा भरण्यासाठी महाविद्यालयाकडून प्रतीक्षा केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!