Share

जळगावमधील मानहानीकारक पराभवानंतर ‘त्या’ नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी 30 हजार पानांची याचिका

Published On: 

जळगाव : दि. १८ मार्च रोजी जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली होती. एकूण ७५ नगरसेवकांपैकी ५७ नगरसेवक भाजपचे, १५ नगरसेवक शिवसेनेचे तर ३ एमआयएमचे असूनही शिवसेनेनं महापालिकेत झेंडा फडकावला आहे. जळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे.

भाजपच्या २७ हुन अधिक नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेला पाठींबा दिला होता. भाजपच्या २७ हुन अधिक नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेला पाठींबा दिल्यामुळे जळगाव मध्ये भाजपचा पराभव झाला. जळगावातील या पराभवामुळे भाजपचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाराजन यांना मोठा धक्का मानला जात आहे.

गिरीश महाजन यांनी या बंडखोर नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. फुटलेल्या नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची कारवाई करण्यासाठी भाजपकडून आज नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका तब्बल तीस हजार पानांची असल्याची माहिती आता समोर येत आहे. आता या नगरसेवकांवर कारवाई होणार का ? हे औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!