भिवंडी : भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून पाच जखमींना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजून काही लोक दगवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील टीडीआरएफ तसेच एनडीआरएफचे जवान मदत कार्यात गुंतले आहेत. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड इथली ही तीन मजली जीलानी इमारत पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून दुर्घटना घडली. रात्रीची वेळ असल्याने सर्व कुटुंबीय घरात झोपलेले असताना ही दुर्घटना घडल्याने, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 25 कुटुंबातील 70 ते 80 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सुमारे तीस वर्षे जुनी जीलानी बिल्डिंग धोकादायक म्हणून महानगरपालिकेने घोषित करुन या इमारतीस दोन वेळा नोटीस बजावण्यात आली होती. दुर्घटनेत इमारतीचा एक भाग पूर्ण कोसळला असून दोन मजले हे गाडले गेले आहेत. अग्निशमन दल आणि ठाण्यातील टीडीआरएफ तसेच एनडीआरएफचे जवान युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. आतापर्यंत ढिगाऱ्या खालून 12 जणांना बाहेर काढले असून त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढले आहे. त्यांना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- थरारक! ओढ्यात वाहून जाणाऱ्या तरुणास जिगरबाज तरुणांनी वाचवले! नक्की वाचा ‘हे’ वृत्त
- ‘धनगर आरक्षण न मिळाल्यास तर महाविकास आघाडीला सळो कि पळो करू’, ओबीसी नेते प्रकाश शेडगे आक्रमक
- पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उदघाटन
- द्रोह करणाऱ्या त्या पोलिसांची नावे जाहीर करा, अटक करा – प्रकाश आंबेडकर
- काँग्रेसचा राज्यसभेतील गोंधळ म्हणजे निव्वळ तमाशा : अतुल भातखळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

