मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टीने आता सतत महत्वाच्या बाबी समोर येत आहेत. नुकतेच राज्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा सराव व्हावा यासाठी प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर आता आणखी एक दिलासादायक बातमी विद्यार्थ्यासाठी असल्याचे समजले जात आहे.
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचा निकष आता ३५ ऐवजी २५ टक्के करण्याचा विचार करण्यात येत आहे. याबाबत राज्य परीक्षा नियोजन समितीकडून गांभीर्याने विचार होत आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने कमी स्वरूपाचा अभ्यासक्रम असल्याने हा निर्णय घेतला अजण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे २०२० -२१ या वर्षात कमी कालावधीसाठी शाळेचे वर्ग भरले. वर्गातून शिक्षण न झाल्याने अभ्यासक्रमही कमी करण्यात आला आहे. ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नसल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत.
खासगी शाळांमधील शुल्काबाबत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियमांमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी पालक, पालक संघटना, शैक्षणिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. या सूचना शालेय शिक्षण विभागाने नेमण्यात आलेली समिती ग्राह्य धरणार आहे. पुढील एक महिना www.research.net/r/feeregulation या संकेतस्थळावर सूचना नोंदवता येतील, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- …आता सगळीकडे फक्त महाविकास आघाडी सरकार; भाजपची ओहोटी सुरु – राष्ट्रवादी काँग्रेस
- महाजनांना धक्का : भाजपचे तब्बल 27 फुटल्याने जळगाव महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला
- …म्हणून उर्मिला मातोंडकरांनी खास ट्विट करून आदित्य ठाकरेंचं केलं अभिनंदन
- भारताचा गोलंदाजपटू राहुल शर्माच्या वडिलांचे कोरोनोमुळे निधन
- येत्या वर्षभरात हटवण्यात येणार सर्व टोलनाके; नितीन गडकरींची मोठी घोषणा


