Share

कोविडकाळात तुरुंगातील गर्दी टाळण्यासाठी पॅरोलवर सोडण्यात आलेले तब्बल 200 कैदी फरार ?

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : गेल्या वर्षी कोरोना साथीच्या साथीचा प्रादुर्भाव झाल्याने देशभरात टाळेबंदी लादण्यात आली होती. तुरुंगातील गर्दी कमी व्हावी म्हणून त्या काळात तिहार जेल प्रशासनाने कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एकूण 1164 कैद्यांना पॅरोलवर सोडले होते. दरम्यान,पॅरोल कालावधी संपल्यानंतर, कैद्यांना तुरुंगात परत जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या पण आतापर्यंत तब्बल 200 कैदी परत आले नसल्याचे समोर आले आहे.

जन्मठेपेची शिक्षा झालेल्या शमशाद नावाच्या आरोपीलाही आपत्कालीन पॅरोल मिळाला होता. यानंतर तुरूंगातून बाहेर येताच एटीएम फोडताना तो सापडला होता. पॅरोल संपल्यानंतर तोही फरार झाला होता. परंतु दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. 2010 मध्ये धौलकुआन सामूहिक बलात्कार प्रकरणात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

लॉकडाऊन दरम्यान कारागृह प्रशासनाने काही कैद्यांना 45 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला, तर काही कैद्यांना आपत्कालीन पॅरोल देण्यात आला होता. फरार कैद्यांना पकडता यावे यासाठी तिहाड़ जेल प्रशासन लवकरच यासंदर्भात प्रशासनाला पत्र लिहणार आहे.

दरम्यान,देशात काही राज्यात दैनंदिन कोविडचे नवे रुग्ण पुन्हा मोठ्या संख्येने आढळत आहेत. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासात नोंदवल्या गेलेल्या नव्या रुग्णांपैकी 85.6% रुग्ण या राज्यांमधले आहेत.

गेल्या 24 तासात 23,285 नव्या रुग्णांची नोंद झाली महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 14,317 (दैनंदिन नव्या रुग्णांच्या 61.48%) नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर केरळ 2,133 तर पंजाबमध्ये 1,305 नव्यारुग्णांची नोंद झाली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!