मुंबई: महाविकास आघाडीची महत्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजन थाळीने एक महत्वपूर्ण टप्पा पार केलेला आहे. राज्यातील १० कोटी लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. हा आकडा पाहून शिवभोजन थाळी सुरू करण्यामागचे उद्दिष्ट साद्य होताना दिसत आहे. अशी माहिती राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीची महत्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजन थाळीने एक महत्वपूर्ण टप्पा पार केलेला आहे.राज्यातील १० कोटी लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. हा आकडा पाहून शिवभोजन थाळी सुरू करण्यामागचे उद्दिष्ट साद्य होताना दिसत आहे. pic.twitter.com/TUlbTqu113
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) June 10, 2022
“लोकाभिमुख योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जात असल्याने मला समाधान आहे.”, असे छगन भुजबळ यांनी ट्वीट करत म्हटले आहे. दरम्यान राज्यातील गरीब व कष्टकऱ्यांना एकवेळचे जेवण अत्यल्प दरात मिळावे, यासाठी राज्य सरकारने २०२० रोजी शिवभोजन योजना सुरू केली होती. या योजनेतून गरीब व कष्टकऱ्यांना दहा रुपयांत पोटभर जेवण मिळते.
शहरातील रुग्णालये, बसस्थानके, शासकीय कार्यालये, बाजारपेठेची ठिकाणे या ठिकाणी ही शिवभोजन थाळी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या योजेनेन आज एक महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राज्यसभेसाठी मत महाविकास आघाडीला का? बच्चू कडू म्हणाले…
- प्रियांका चोप्राने शेअर केला ब्रा घातलेला फोटो ; पती निक जोनस आणि रणवीरने दिली प्रतिक्रिया
- अमृता फडणवीस ‘या’ चित्रपटासाठी गाणार रोमँटिग साँग; ट्वीट करत म्हणाल्या…
- आयपीएल २०२२ मध्ये ‘या’ खेळाडूला कोणत्याही संघाने केले नाही खरेदी; आता इंग्लंडमध्ये पाडतोय धावांचा पाऊस
- “नेमका धोका कुणाला? महाडिक की बोंडे?” ; मिटकरींचा फडणवीसांना सवाल


