Share

नशीब, डोकलाम विषय संपला, नाहीतर मुंबई विदयापीठ डोकलामचेही कारण देईल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई विद्यापीठाच्या निकालासाठी रोज ‘तारीख पे तारीख’ असा खेळ सुरु असल्याच दिसत आहे. निकाल रखडल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागेल आहे. आता तर विद्यापीठाने कारण देण्याचा उच्चांक केला असून बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडल्याचं अजब कारण मुंबई हायकोर्टात दिलं आहे. या सर्व गोष्टींवर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी खोचक टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठवर निशाना साधत ‘नशीब डोकलाम विषय संपला नाहीतर डोकलाम आणि नॉर्थ कोरियाचं कारण देखील उशीर झाला म्हणून देतील’ असे ट्विट करत निशाना साधला

दरम्यान मुंबई विद्यापीठाने निकाल रखडण्यासाठी मुंबईतील पावसावर खापर फोडल्यानंतर आता बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडल्याचं मुंबई हायकोर्टात सांगितल आहे. तर याआधी वेगवेगळी कारणे देत सहावेळा निकाल पुढे सरकवला आहे. आता १९ सप्टेंबरपर्यत निकाल जाहीर करू अस सांगण्यात आल आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!