Share

गायरान जमिनीच्या वादातून तरुणाची गळा चिरुन हत्या, येसगाव शिवारातील घटना

Published On: 

औरंंगाबाद : गायरान जमिनीच्या वादातून पाच जणांनी तरुणांची गळा चिरुन हत्या केली. ही खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.३०) मध्यरात्री एकच्या सुमारास येसगाव शिवारातील गणपती गायरानमध्ये उघडकीस आली. कल्याण जायफुल्या पवार असे मृताचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल पवार, अनिस परदेशी चव्हाण, विमल परदेशी चव्हाण, केवल बंडू भोसले अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मारेक-यांची नावे असून त्यांचा साथीदार पमू बंडू भोसले हा पसार झाला आहे. जाहीरातीबाई जायफुल्या पवार (वय ६०, मुळ रा. पालम, जि. परभणी) ही पती व मुलांसह गणपती गायरान येथील दहा एकर सरकारी गायरान जमिनीवर शेती करते. गेल्या काही दिवसापासून शेतीच्या कारणावरून जाहीरातीबाई पवार आणि राहुल पवार यांच्यात वाद सुरू होता. या वादातूनच कल्याण पवार याचे दोन्ही पाय तोडून त्याचा गळा चिरून गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास हत्या करण्यात आली होती. तसेच त्याचा मृतदेह येसगाव शिवारातील गणपती गायरानमधील शेताजवळ असलेल्या कडुलिंबाच्या झाडाखाली फेकण्यात आला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सराफ, पोलिस निरीक्षक संदीप गुरमे आदींनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून राहुल पवार, अनिस परदेशी चव्हाण, विमल परदेशी चव्हाण, केवल बंडू भोसले या चौघांना ताब्यात घेतले. तर त्यांचा एक साथीदार पमू भोसले हा फरार झाला आहे. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप गुरमे करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!