मुंबई : एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात आत्महत्या केली आहे. स्वप्निल लोणकर (वय-२४) असे त्याचे नाव आहे. स्वप्निलने फुरसुंगी परिसरातीलराहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना बुधवारी (दि.२९ जून) रोजी घडली आहे. पण त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी काल आढळून आल्याने धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात तो पास देखील झाला होता. पण, यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. याच नैराश्यातून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले.अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाच्या आत्महत्येमुळे विद्यार्थी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता भाजपचे नेते व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी देखील सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
‘नवयुवकांचे आणखी किती बळी घेणार आणखी राज्यसरकार स्वप्नील लोणकर या MPSC च्या विद्यार्थी पूर्व व मुख्य परीक्षा पास होऊनही मुलाखत झाली नाही.राज्यसरकार च्या हलगर्जी पणा मुळे अधिकारी होणाऱ्या युवकाला आत्महत्या करावी लागली.’ अशा आशयाचे ट्वीट करून लोणीकर यांनी सरकारवर निशाना साधला आहे.
नवयुवकांचे आणखी किती बळी घेणार आणखी राज्यसरकार स्वप्नील लोणकर या MPSC च्या विद्यार्थी पूर्व व मुख्य परीक्षा पास होऊनही मुलाखत झाली नाही.राज्यसरकार च्या हलगर्जी पणा मुळे अधिकारी होणाऱ्या युवकाला आत्महत्या करावी लागली राज्य सरकारचा जाहिर निषेद्य.@BJP4Maharashtra
— Babanrao Lonikar (@BabanraoLonikar) July 4, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘पुढील २५ वर्षे राजकारणातच राहणार, संन्यास घेण्याची वेळच येणार नाही’; फडणवीसांना विश्वास
- ‘राज्य सरकारने अधिवेशनापासून पळ काढलाय’; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस कडाडले
- …अन् भाजपच्या चित्रा वाघ राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला म्हणाल्या, ‘पोलिसांकडे तक्रार कर मी तुझ्या सोबत’
- ‘शेतकरी, आरक्षण, दूध, नियुक्त्या असे प्रश्न सभागृहात मांडू दिले जाणार नसतील तर…’; फडणवीसांचा इशारा
- सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना मिळणार दीड कोटीपर्यंतची कामे, आ. सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश


