Share

‘शेतकरी, आरक्षण, दूध, नियुक्त्या असे प्रश्न सभागृहात मांडू दिले जाणार नसतील तर…’; फडणवीसांचा इशारा

Published On: 

मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्या आणि परवा म्हणजेच ५ व ६ जुलै या दोन दिवसांतच पार पडणार आहे. कोरोनाचं कारण देत सरकारने हे अधिवेशन देखील अवघ्या दोन दिवसात गुंडाळण्याचं आयोजन केलं असून विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मात्र यावर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांची चर्चा करण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नितेश राणे आदी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करण्यात आली. फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर विविध मुद्द्यांवरून हल्लाबोल केल्याचं दिसून आलं.

‘आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाचे प्रश्न, धान घोटाळा, कोरोनाचा विषय, बारा बलुतेदार यांचे प्रश्न असे कोणतेच प्रश्न मांडायचे नाही. भ्रष्टाचार मांडायचा नाही, याची व्यवस्था केली आहे. जे विषय सभागृहात मांडू दिले जाणार नाही, ते सभागृहाबाहेर मांडू, आंदोलन करू. तेव्हा बोलू नका आंदोलन कशासाठी करताय, चर्चा करा,’ असं भाष्य करत फडणवीसांनी येत्या काळात अशा विविध प्रश्नांनावरून भाजप तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.

ना लक्षवेधी, ना प्रश्नोत्तरे, ना लेखी उत्तरे

लक्षवेधी सूचना, प्रश्नोत्तरे, अर्धा तास चर्चा घेण्यात येणार नाहीत. स्वीकृत झालेल्या प्रश्नांना लेखी उत्तरे देता आली असती. पण, ते सारे प्रश्न व्यपगत करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकही संसदीय आयुध वापरता येणार नाही, असा आदेश काढण्यात आलाय, असं भाष्य करतानाच राज्य सरकारने अधिवेशनापासून पळ काढलाय अशी टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलीये.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!