मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्याचं काम सुरु आहे, असा आरोप करत केंद्र सरकारवरा टीका केली आहे. आम्ही जो त्रास भोगलाय त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. नियती कुणालाही माफ करत नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी केद्र सरकारवर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ यांना नंतर क्लिनचिट मिळाली. मग त्यांनी इतका काळ जो तुरुंगात घातला त्याचं काय? त्याची भरपाई कोण करणार? पवार कुटुंबीय, मी, अनिल देशमुख, छगन भुजबळ, अनिल परब, प्रताप सरनाईक असे फक्त आम्हीच तुम्हाला दिसतोय का? भाजपमध्ये किंवा त्यांच्या चमचा मंडळात सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का? आम्ही तुम्हाला घाबरत नाही, कारण आमचं काहीच पाप नाही. तुम्ही पापी लोकं बुरखे घालून फिरता आणि आमच्यावर आरोप करत चिखलफेक करता. याची किंमत भाजपला चुकवावी लागेल. आम्ही जो त्रास भोगलाय त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. नियती कुणालाही माफ करत नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, ज्या व्यक्तीने राज्याच्या गृहमंत्र्यांवर भन्नाट आरोप केले आज तो बेपत्ता आहे, त्याला फरार घोषित करावं लागलं. ती व्यक्ती कुठे आहे हे कुणाला माहिती नाही. हे सगळ्यात मोठं विडंबन आहे. जर ते पळून गेले असतील तर त्यात केंद्र सरकारचा हात आहे. केंद्राच्या मदतीशिवाय कुणीही हवाई, समुद्री किंवा रस्त्याच्या मार्गाने देशाच्या सीमा पार करू शकत नाही. तुम्ही आमच्यावर आरोप करून त्यांना पळवून लावलंय, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- तुमचं सगळं चमचा मंडळ धुतल्या तांदळाचं आहे काय?- संजय राऊत
- आधी तक्रारींचे निराकरण मगच नियुक्त्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे
- देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल- शरद पवार
- गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करा- राहुल गांधी
- क्रांती रेडकरने शेअर केले समीर वानखेडेंचे जन्म प्रमाणपत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

