मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनतेने अनेक ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे अनेक नागरिक शक्य तितक्या लवकर जाऊन लसीकरण करुन घेत आहेत.
पण सध्या राज्यात लसीकरणाचा वेग प्रचंड मंदावला आहे. मुंबईतही तशीच परिस्थिती आहे. १८-४४ वयोगटातील नागरिकांना केलं जाणारं लसीकरण तर नावालाच आहे. लसीच्या तुटवड्यामुळं वेगानं लसीकरण होत नसल्याची तक्रार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तसंच लस उपलब्ध करून दिल्यास २४ तास ३ शिफ्टमध्ये काम करूनही लसीकरण करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे की, संपूर्ण देशभरात ज्या पद्धतीनं लस पुरवठा होत आहे, तो अत्यंत कमी आहे. राज्याचा विचार करता महाराष्ट्र सरकारला लसींचा जो साठा दिला जातो, त्यापैकी सर्वाधिक साठा मुंबईसाठी मिळतो. मात्र मुंबईत आम्हाला उपलब्ध होणारा लसींचा साठाही अत्यंत कमी पडत आहे. आम्हाला जर सरकारनं मुबलक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध करून दिला तर आरोग्य कर्मचारी २४ तास ३ शिफ्टमध्ये काम करून लसीकरण मोहीम पूर्ण करतील, अशी तयारीही किशोरी पेडणेकर यांनी दाखवली आहे.
दरम्यान कालपर्यंत लसीकरण मोहिमेत १ कोटी ६७ लाख ८१ हजार ७१९ डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, काल ५ मे रोजी महाराष्ट्रात १५८६ लसीकरण केंद्रांद्वारे एकूण २ लाख ५९ हजार ६८५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील १ लाख ५३ हजार ९६७ नागरिकांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात लॉकडाऊन वाढणार ? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
- ‘नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे गुलाम, गुलामाच्या बोलण्याला फारसं महत्त्व नसते’
- उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या प्रकृतीची माहिती कुटुंबियांना देण्याची होतेय मागणी
- भारतीय अधिकाऱ्यांचे कौतुक केल्याने पाकचे पंतप्रधान इम्रान खान अडचणीत
- चोरट्या मार्गाने तळीरामांना दारू विकणाऱ्या ३८ जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, ९ महिलांचा समावेश


