🕒 1 min read
कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब बंदी प्रकरणावर सर्वच बाजूने चर्चा आणि प्रतिक्रियांना उधाण आले आहे. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असून लवकरच निर्णय येणे अपेक्षित आहे. आता या प्रकरणावर सरहद गांधी, खान अब्दुल गफार खान यांची नात आणि ऑल इंडिया पाखटून जिरगा-ए-हिंद च्या अध्यक्षा यास्मिन निगार खान यांनी मत दिले आहे.
खान म्हणाल्या, मला वाटते शाळेत गणवेशाचे पालन करणे योग्य आणि बंधनकारक आहे. मुली शाळा आणि महाविद्यालायच्या आवारात बुरखा आणि हिजाब बांधून प्रवेश करतात त्यामुळे त्यांना ओळखणे कठीण जाते तसेच हिजाब किंवा बुरखा बांधणे यापेक्षा स्कार्फ घालणे उत्तम आहे. त्यामुळे पूर्ण चेहरा झाकला जात नाही. काही महिला मुली मक्का सारख्या ठिकाणी हिजाब आणि स्कार्फ न घालताच जातात. मला वाटते या गोष्टीवर कोणीही राजकारण करू नये. शाळेत सर्व मुले समान आहेत. सर्वांना समानतेची वागणूक देणे आणि सर्वच धर्मांचा आदर करणे महत्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या:
- VIDEO : कॅच घेताच विराटच्या अंगात अवतरला अल्लू अर्जून, मैदानात श्रीवल्लीवर थिरकला!
- शिवसेनेचे शंभर गुंड माझ्याकडे दगड भिरकावत होते, हे पाहूनही पोलिसांनी काहीच केलं नाही- किरीट सोमय्या
- “कॉंग्रेस मुक्त भारत सोडा, अगोदर कॉंग्रेस मुक्त भाषण करून दाखवा”, यशोमती ठाकूर यांचे मोदींना आव्हान
- ‘पाचही राज्यात भाजपची नव्हे, असंतोषाची लाट’; विजय वडेट्टीवार यांची टीका
- हॉकी प्रो लीग: भारतीय संघाने उडवला १०-२ ने आफ्रिकेचा धुव्वा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
