Share

पंकजा मुंडेंच्या पुढाकाराने पूरग्रस्तांसाठी २२० क्विंटल अन्नधान्य रवाना

Published On: 

बीड : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेत परळी शहरातून मदतफेरी काढली. या मदतफेरीत शहरातील नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पूरग्रस्तांसाठी लाखो रुपयांची रक्कम जमा केली. त्यानंतर आता तब्बल २२० क्विंटल अन्नधान्य पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आले आहे. याबाबत पंकजा मुंडेंनी ट्विटरवरून ही माहिती दिली.

पंकजा मुंडे यांनी गुरुवारी सकाळी सव्वाअकरा वाजता परळी शहरातील चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मदत फेरीला सुरवात केली. शहरातील बस स्थानक रोड, एक मिनार चौक, स्टेशन रोड, टॉवर गणेशपार आदी प्रमुख मार्गावरून ही मदतफेरी काढली. फेरीत पंकजा मुंडेंनी शहरातील व्यापाऱ्यांना मदतीचे आवाहन करत संवाद साधला. या वेळी पंकजांच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आर्थिक मदतीबरोबरच धान्यासह साहित्याची मदत केली.

‘आम्ही प्रत्येक संकटात मुंडे प्रतिष्ठानतर्फे मदत करत असतो. वाढदिवस हा नेत्याचा सोहळा असतो. पण व्यक्तीचा सोहळा मुंडे साहेबांना मान्य नव्हता. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती केली होती माझ्या वाढदिवसाला सोहळा नको. म्हणून मदत फेरी काढली. मी सध्या तरी नुकसानग्रस्त भागात जाणार नाही. मी जाण्याने गर्दी होऊन यंत्रणांवर ताण नको. त्यापेक्षी मी माझी मदत तिकडे पाठवेन, जिथे पूरग्रस्तांना मदत हवी आहे, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!