🕒 1 min read
अमरावती : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचाराचे पडसाद आजही उमटत आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला लक्ष्य करत विरोधकांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या पुत्राला अटक करण्याची मागणी आजही लावून धरली आहे. या घडामोडींवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भाष्य करत भाजपला लक्ष्य केले आहे.
देशामध्ये यापूर्वी धर्म आणि जातीच्या नावावर दंगली झाल्या आहेत. आता मात्र शेतकऱ्यांविरुद्ध दंगली घडविण्याचा कट केंद्र शासन जाणीवपूर्वक घडवत असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.लखीमपूर खीरीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हत्येनंतर हि बाब स्पष्ट झाली आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या अराजकतेचा वचपा काढावा असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आईच. लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीमध्ये काळे झेंडे दाखवणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलाने कार चढवली असा आरोप होत आहे. या दुर्घटनेमध्ये काही जणांचा मृ्त्यू झाला. त्यानंतर लखीमपूर खीरीमध्ये संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दोन गाड्यांची जाळपोळ केली. या हिंसाचारामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चार शेतकरी आणि चार राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता.
महत्वाच्या बातम्या:
- राहुल गांधींना उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी नाही, प्रियंका गांधींसह ११ जणांना अटक
- उत्तर प्रदेशात झालेल्या निर्घृण हत्या सहन केल्या जाणार नाहीत- मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी
- ‘टीम इंडिया स्पर्धा करण्यालायक नाही’, पाकिस्तानच्या माजी अष्टपैलूचं वक्त्यव्य चर्चेत
- …म्हणून बारामतीला यायला प्रत्येकाला आवडतं; सुप्रिया सुळेंचा सोमय्यांना टोला
- तालिबान आणि योगी सरकारमध्ये केवळ दाढीचा फरक, खासदार रजनी पाटील यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
