नवी दिल्ली: पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लखीमपुर घटनेबाबत आक्रमक भूमिका घेतली. तसेच अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेत चरणजीत सिंह यांनी उत्तर प्रदेशात शेतकरी कायद्यावरुन झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला.
‘मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. तसंच ड्रग्ज आणि शस्त्रांची तस्करी थांबवण्यासाठी पंजाबला जोडून असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याचीही मागणी केली आहे’, अशी माहिती चरणजीत सिंग चन्नी यांनी दिली आहे.
तसेच उत्तर प्रदेशात झालेल्या निर्घृण हत्या कदापि सहन केल्या जाणार नाहीत असंही त्यांनी म्हटले आहे. आपल्या नेत्यांना अटक करण्याची ही पद्धत बंद झाली आहे. कर्तारपूर कॉरिडोअर लवकरात ललकर सुरु करावं अशी विनंती केली आहे. आता यावर सरकारच त्वरित निर्णय घेणार असल्याचेही मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांनी म्हटले आहे. दरम्यान चरणजीत सिंग चन्नी यांना उत्तर प्रदेशचा दौरा करण्याची परवानगी नाकारण्यात आल्यानंतर अमित शाह यांच्यासोबत त्यांनी भेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणून बारामतीला यायला प्रत्येकाला आवडतं; सुप्रिया सुळेंचा सोमय्यांना टोला
- ‘महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी सर्वोतोपरी मदत करणार’, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांची ग्वाही!
- ‘देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती अशक्य! लॉटरी एकदाच लागते, वारंवार नाही’
- एक प्रभाग तीन सदस्य ही पद्धत लोकशाहीला घातक आहे – रामदास आठवले
- ओला दुष्काळ जाहीर करा, शिवसेना आमदार संतोष बांगर यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
