उत्तर प्रदेश: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनाही योगी सरकारने प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे लखीमपूर खिरी हिंसाचाराचे पडसाद मंगळवारीही उमटले. तर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह ११ जणांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ही कारवाई बेकायदा असून, ३८ तासांनंतरही आपल्याला संबंधित कागदपत्रे, नोटीस देण्यात आलेली नाही, असे प्रियंका यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
आता याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे पाचसदस्यीय शिष्टमंडळ आज लखीमपूरला भेट देणार आहे. मात्र उतत्र प्रदेश सरकारने त्यांना प्रवेश परवानगी नाकारली आहे. तर या भेटीची परवानगी देण्याची मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पत्राद्वारे केल्याचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान लखीमपूर खेरीमध्ये उत्तर प्रदेश सरकारने जमावबंदीचे १४४ कलम लागू केलं आहे. त्यामुळे याठिकाणी राजकीय नेत्यांना परवानगी नाकारण्यात येत आहे. मात्र काँग्रेस तसेच विरोधी पक्षाने आता याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणून बारामतीला यायला प्रत्येकाला आवडतं; सुप्रिया सुळेंचा सोमय्यांना टोला
- ‘महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी सर्वोतोपरी मदत करणार’, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांची ग्वाही!
- ‘देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती अशक्य! लॉटरी एकदाच लागते, वारंवार नाही’
- एक प्रभाग तीन सदस्य ही पद्धत लोकशाहीला घातक आहे – रामदास आठवले
- ओला दुष्काळ जाहीर करा, शिवसेना आमदार संतोष बांगर यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
