🕒 1 min read
मुंबई : नुकतीच मध्य प्रदेशमध्ये आरोग्य विभागाची परिस्थिती किती वाईट आहे हे दाखवणारी एक घटना घडली. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, या मुद्द्यावर असता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘देशातील ग्रामीण-आदिवासी भागातील आरोग्य सेवेची हेळसांड हा काही आपल्याकडे नवीन प्रश्न नाही. रुग्णाला किंवा मृतदेहाला खांद्यावर घेऊन मैलोगणती करावी लागणारी पायपीटही तेथील गरीबांच्या पाचवीलाच पुजली आहे. मध्य प्रदेशातील रिवा येथील अशाच घटनेने ही दुरवस्था पुन्हा चव्हाटय़ावर आणली इतकेच. ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’, असे कविवर्य सुरेश भट यांनी म्हटले आहे. मात्र येथे तर मृत्यूनंतरही मरणयातनांपासून सुटका नाही, अशी या दुर्दैवी जिवांची दुरवस्था आहे. त्यांच्या खांद्यावरील हे मरणयातनांचे ओझे कधीतरी उतरणार आहे का?.’
पुढे ते म्हणाले की,‘आपल्या देशाने ७० वर्षांत केली नाही तेवढी प्रगती गेल्या सहा वर्षांत केली, असे दावे सध्याचे सत्ताधारी नेहमीच करीत असतात. पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचे दावे केले जात आहेत. महागाई दिवसेंदिवस नवनवे विक्रम करीत असली तरी आपला देश आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने कशी वेगाने वाटचाल करीत आहे, असे चित्रदेखील रंगविले जात आहे. मात्र या सर्व फुग्यांना टाचणी लावणारी आणि या चित्रातील रंग धुसर करणारी एक हृदयद्रावक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, ‘मध्य प्रदेशातील रिवा येथे आजारी महिलेला १० किलोमीटर अंतरावरील आरोग्य केंद्रात उपचारासाठी न्यायचे होते. परंतु त्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. शेवटी या महिलेच्या मुलींनी आजारी आईला खाटेवर झोपवून १० किलोमीटर पायपीट करीत आरोग्य केंद्रात आणले. मात्र तोपर्यंत आजारी महिलेचा मृत्यू झाला होता. पुन्हा या महिलेच्या मुलींची फरफट येथेच थांबली नाही. मृतदेह परत गावाकडे नेण्यासाठीही त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आईचा मृतदेहही त्यांना खाटेवर टाकूनच पायी परत नेण्याची वेळ आली. त्यातही संतापजनक बाब अशी की, संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना त्यात काहीही गैर वाटले नाही. त्यांच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत. उलट या घटनेला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. सोशल मीडियावरून विनाकारण या घटनेला ‘व्हायरल’ केले जात आहे, असे तारे या महाशयांनी तोडले.’
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : CSKच्या शिवम दुबेची धुव्वादार बॅटिंग! चाहत्यांना आठवला युवराज सिंग
- IPL 2022 : थाला..थाला..थाला! महेंद्रसिंह धोनीचा मुंबईत मोठा पराक्रम; नक्की वाचा!
- IPL 2022 : उथप्पाची सुरुवात अन् थालाचं फिनिशिंग…भारीच! चेन्नईचा नवख्या लखनऊसमोर २१० धावांचा डोंगर
- IPL 2022 : ९ चेंडूत ३८ धावा..! मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर घोंगावलं उथप्पाचं वादळ!
- IPL 2022: रवी बिश्नोईच्या सुपर थ्रोवर ऋतुराज रन आऊट ; अवघ्या १ धावांवर माघारी परतला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
